सम्यक बुद्ध विहार येथे भगवान बुद्ध आणि त्यांचा धम्म या ग्रंथाचे वाचन सुरू

सिध्दार्थ दिवेकर (यवतमाळ जिल्हा प्रतिनिधी) मो.9823995466
उमरखेड (दि.२१ जुलै) शहरातील डॉ.बाबासाहेब आंबेडकर वार्ड मधील सम्यक बुद्ध विहार येथे सकाळी ०९:०० वाजता आषाढ पौर्णिमेनिमित्त भगवान गौतम बुद्ध आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमांना पुष्पहार अर्पण करून पंचशील ध्वजाचे ध्वजारोहण करण्यात आले.
त्यानंतर रात्री ८:३० वाजता भगवान गौतम बुद्ध आणि त्यांचा धम्म हा ग्रंथ पठण करण्याची सुरुवात केली.
वर्षावास म्हणजे पावसाळ्यातील तीन महिने अर्थात आश्विन पौर्णिमेपर्यंत निमंत्रित बुद्ध विहारात जीवन व्यतीत करणे.
या काळात भिक्खू मध्ये विनयात कमीपणा आला असेल त्यांनी ज्येष्ठ भिक्खुंद्वारा पूर्तता करणे, ध्यान-साधना करणे, बौद्ध उपासक / उपासिकांना धम्म शिकविणे, उपासकांकडून अष्ट पुरस्कारांचे धम्मदान स्वीकारणे व उर्वरित नऊ महिने धम्म-प्रचार-प्रसाराला घालविणे हे भिक्खूंचे कार्य असते.
तथागतांनी बुद्धत्व प्राप्तीनंतर पंचवर्गीय संन्याशांना आपला अष्टांगिक मार्ग, प्रतीत्य समुत्पाद, चार आर्यसत्य हे समजावून दिल्यानंतर त्यांना ते कळले.
इसिपतन वन (आधुनिक सारनाथ), वाराणसी येथे अनुत्तर असे पहिले धम्मचक्र प्रवर्तन केले.
आश्विन पौर्णिमेला एकसष्ठ अर्हत भिक्षुंच्या समवेत धम्मचक्राची घोषणा केली.
चारही दिशांना जाऊन बहुजन हिताय – बहुजन सुखाय धम्मची अशी सिंहगर्जना केली. जेव्हापासून तथागतांनी आषाढी पौर्णिमेला भिक्षु समवेत प्रथम वर्षावास इसिपतन मध्ये केला, तेव्हापासून भिक्खू वर्षावास प्रारंभ करतात.
भगवान बुद्धाच्या काळात बुद्धांनी सर्व भिक्षूंना धम्माचा प्रसार करण्याचे आदेश दिला की, आषाढ पौर्णिमेपासून ते अश्विनी पौर्णिमेपर्यंत सर्व भिक्षूंनी एकाच ठिकाणी रहावे, भिक्षेसाठी गावात जाऊ नये. एकाच ठिकाणी राहून धम्माचे पठण अध्ययन करावे.
भगवान बुद्ध काळापासून वर्षावास अस्तित्वात आहे.
भगवान बुद्धांनी पहिला वर्षावास इ.स.पू. ५२७ मध्ये सारनाथच्या इसिपटन मध्ये केला आणि त्यानंतर ४५ वर्षावास त्यांनी श्रावस्ती, जेतावन, वैशाली, राजगृह इत्यादी ठिकाणी केले.
हे सर्व भगवान गौतम बुद्ध आणि त्यांचा धम्म या ग्रंथातून भंते कीर्ती बोधी यांनी आपल्या प्रवचनातून सांगितली.
यावेळी पत्रकार सिद्धार्थ दिवेकर, रमामाता महिला मंडळाच्या अध्यक्षा उषाताई इंगोले,भारतीताई केंद्रेकर, शांताबाई दिवेकर,जिजाबाई दिवेकर, सुभद्राबाई पाईकराव,यशोधरा धबाले, जानकाबाई इंगोले,रंजनाबाई आठवले, उज्वला धबाले,कांचन दिवेकर, जिजाबाई धुळेकर,आशा दिवेकर, दिपाली दिवेकर इत्यादी अनेक रमामाता महिला मंडळ च्या अनेक महिला पदाधिकारी उपस्थित होत्या.