रामप्रहरी निघणार्या काकड आरतीने पोफाळी भक्तीमय

शेख मुजाहिद
सहसंपादक मो.7798306192
रामप्रहारी निघणाऱ्या काकडा आरतीने भल्या पहाटे ईश्वराला ओवाळण्याची परंपरा भक्ती सांंप्रदायामध्ये प्रचलित झाली असुन कार्तिक महिन्यामध्ये गावागावात भक्तीरसाचा अलोटसागर उसळला आहे.रामप्रहरी निघणार्या काकड आरतीने पोफाळी भक्तीमय बनली असुन रामनामाने गावकरी तल्लीन झाले.दिपावलीपासुन सुरू झालेल्या काकड आरतीच्या सोहळ्याने गावात आनंदाला उधान आले आहे.
। ज्ञानदेवे रचियला पाया ।
। तुका झालासे कळस ।।
या अभंगाप्रमाणे वारकरी सांप्रदायाचा पाया संत ज्ञानेश्वरांनी रचला आहे.तर या पायाच्या आधारावर उभ्या झालेल्याभक्तीसांप्रदायाच्या पाऊलावर संत तुकारामने कळस लावला आहे. विठ्ठलाच्या नामस्मरणाची गोडी संत सांप्रदायाच्या तत्वज्ञांनातुन सज्जन प्रवृतीच्या नागरिकांना उपलब्ध झाली असुन रामप्रहरी ईश्वराला साकडे घालण्याची परंपरा काकडा आरतीच्या रूपातुन पुरोगामी महाराष्ट्राच्या कानाकोपर्यात रूजली आहे. याचा अनुषंगाने उमरखेड तालुक्यातील पोफाळी येथील गावातील भजनी मंडळाने काकडा आरतीचा सोहळा मागील काही वर्षापासुन सुरु आहे सुर्यनारायणा उगवण्याआधीच गावातील भजनी व युवक मंडळ हनुमान मंदीरामध्ये जमतात. तेथुन गावातील मुख्य रस्ताने टाळमृदंगाच्या गजरात हरिभजनाने तल्लीन होवुन भारूड,अंभग,भजन, भक्तीमय गीते आदीचे गायन करून मधुर स्वरात ईश्वराला आर्तहाक घालतात.
उठा पांडुरगा आता,दर्शन द्या सकळा।
झाला अरूणोदय,सरली निद्रेची वेळा।
संत साधु मुनी अवघे झालेति गोळा।
विष्णुदास नामा घेउनी पंचारती काकडा।।
