Uncategorized

माऊलीच्या मारेकऱ्यांना फाशी द्या(गोसावी समाज आक्रमक ; मुख्यमंत्र्यांना निवेदन )

शेख मुजाहिद ससंपादक मो.7798306192

उमरखेड : धाराशिव जिल्हायातील पाध्रुड येथील गोसावी समाजाच्या, एका युवकाची निघ्रुन हत्या करण्यात आली. या प्रकरणातील दोषी आरोपींना कठोर शासन व्हावे व पिडीत कुटूंबियांना शासकीय अर्थीक मदत देण्यात यावी. तसेच या गंभीर प्रकरणाची चौकशी सीआयडी मार्फत करुन दोषींवर कार्यवाही करण्याच्या आदी मागणीचे निवेदन, याप्रकरणी आक्रमक झालेल्या, दशनाम गोसावी समाज संघटना उमरखेडच्या वतीने, उपविभागीय अधिकाऱ्यांमार्फत मुख्यमंत्र्यांना देण्यात आले आहे.

माऊली बाबासाहेब गिरी (18 ) रा पाथ्रुड ता भूम जि धाराशिव असे निघ्रुन हत्या झालेल्या युवकाचे नाव आहे. निवेदना नुसार, दशनाम गोसावी समाज उमरखेडच्या वतीने आपणांस निवेदन सादर करतो की, दशनाम गोसावी समाजाचे संस्थापक आद्य जगतगुरु शंकराचार्यांनी स्थापन केलेल्या या समाजाचे, मुख्य कार्य हे परंपरागत व प्राचिन हिंदु संस्कृतीची जपणुक, पुजन व हिंदू धर्म प्रचार व प्रसार हे राहीले आहे. याच दशनाम गोसावी समाजातील, मौजे पाथ्रुड ता. भूम, जि. धाराशिव येथील गोसावी समाजाच्या स्व. माऊली बाबासाहेब गिरी या एकुलत्या एक 18 वर्षीय युवकाची, क्रुरतेचा कळस गाठत निघून हत्या करण्यात आली. हत्तेपूर्वी सोडण्यासाठी खंडणीही मागितल्याचा आरोप परिवाराकडून करण्यात आलेला आहे. या प्रकरणी सुरु असलेली पोलिस कार्यवाही ही अतिशय असमाधानकारक आहे. हत्ते नंतर प्रकरणातील संपुर्ण आरोपी अजुन ताब्यात घेतले नसुन, यातील काही आरोपी मोकाट असल्याने स्थानिक पोलिसांच्या कार्यवाही वर प्रश्न चिन्ह निर्माण होत आहेत. त्यामुळे स्व. माऊली गिरी यांच्या हत्येतील आरोपींना कठोर शासन होण्यासाठी या प्रकरणाचा तपास सिआयडी कडे देण्यात यावा. तसेच हा खटला फास्ट स्ट्रॅक कोर्टात चालवुन आरोपींना कठोरात कठोर शासन हाईल याची दखल घेण्यात यावी. सोबतच पिडीत कुटुंबियांना शासनाच्या वतीने भरीव आर्थीक मदत करण्याची मागणी करण्यात आली आहे. तसेच प्रकरणी योग्य न्याय न मिळाल्यास समस्त दशनाम गोसावी समाजाला, स्व. माऊली गिरी यांच्या परिवाराला न्याय मिळवुन देण्यासाठी रस्त्यावर उतरुन आंदोलन करावे लागेल. अशी मागणी उपविभागिय अधिकाऱ्यां मार्फत मुख्यमंत्र्यांना देण्यात आलेल्या निवेदनाद्वारे करण्यात आली आहे.यावेळी उमरखेड दशनाम समाज संघटनेचे अध्यक्ष कैलास पर्वत,किशोर भारती, देवबन गोस्वामी, बंटी गिरी, गजानन भारती, नामदेव पुरी, शिवानंद पुरी, रवी पुरी, रमेश पुरी, प्रभाकर पुरी, सतीश गिरी, ईश्वर गोस्वामी, देवानंद भारती, आनंद गिरी, विनोद गिरी, विकास गिरी अदी समस्त दशनाम गोसावी समाज संघटनेचे पदाधिकारी हजर होते.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!