नीट 2024 परीक्षेत संपूर्ण देशभरात प्रचंड भ्रष्टाचार झाल्यानेही परीक्षा पुन्हा घेऊन ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांवर झालेल्या अन्याय दूर करा

औदुंबर ज्येष्ठ नागरिक मंडळांचे उपविभागीय अधिकाऱ्यांना निवेदनातुन मागणी
शेख मुजाहिद
ससंपादक मो.7798306192
नुकत्याच झालेल्या नीट 2024 या परीक्षेत प्रचंड गोंधळ व भ्रष्टाचार झाल्याचे आढळून आले आहे जसे उशिरा फॉर्म सादर करण्याची परवानगी देणे, केंद्र बदलून देणे, नियमबाह्य पद्धतीने ग्रेसमार्क देणे. ज्या विद्यार्थ्यांना प्रश्नांची उत्तरे येत नाही ते प्रश्न कोरे ठेवण्याची सूचना देणे दिनांक 14 जून 2024 ला जाहीर होणारा निकाल चार जून 2024 म्हणजेच दहा दिवस अगोदर जाहीर करणे, एकाच केंद्रातील सहा विद्यार्थ्यांना पैकीच्या पैकी गुण मिळणे, गोदरा गुजरात मधील केंद्रावर विद्यार्थ्यांना विशेष सवलती देणे,काही ठिकाणी परीक्षेच्या एक दिवस अगोदर प्रश्नपत्रिका मिळणे अशा प्रकारच्या संशयित बाबी घडल्याचे उघडकीस आले आहे.अनैतिक मार्गाने पुढे जाणारे डॉक्टर भविष्यात कोणत्या गुणवत्तेचे असतील? हा गंभीर प्रश्न जनतेसमोर पडला आहे याचा ग्रामीण भागातील सर्वसामान्य विद्यार्थ्यांवर त्यांच्या पालकावर हा मोठा अन्याय झाला आहे परीक्षा पद्धती वरील विद्यार्थ्यांचा व नागरिकांचा भरोसा नाहीसा होत आहे म्हणून नीट परीक्षा नियंत्रक एनटीए व त्यातील भ्रष्टाचारी अधिकारी यांना कठोर शिक्षा देण्यात यावी व झालेली नीट परीक्षा रद्द करून सर्व विद्यार्थ्यांची पुन्हा परीक्षा घेऊन गोरगरीब सामान्य विद्यार्थ्यांवर झालेल्यांना दूर करावा अशी मागणी औदुंबर ज्येष्ठ नागरिक मंडळाच्या वतीने धर्मेंद्र प्रधान, केंद्रीय शिक्षण मंत्री, प्रधानमंत्री भारत सरकार यांना निवेदनाद्वारे केली आहे यावेळी प्राचार्य डॉ.वि .ना . कदम, श्रीराम चव्हाण,यशवंत गिरी,बापूराव भोसीकर रवि पुजारी अँड.शिवाजी वानखेडे, सुरेश कदम,विशंभर वानखेडे,उद्धव गायकवाड, रत्नाकर पुजारी, गणेश राणे, शिवलींग अप्पा, आनंदराव चिकणे, भाऊराव चव्हाण, आकाश माने, प्रदिप पिंपरखेडे, सुरेश वाघ, बालाजी चं . वानखेडे, श्रीधर देवसरकर, डॉ . संजय कदम, राठोड, सर इत्यादी हजर होते