इतर मागासवर्गीयांच्या जागेतून मुस्लिम इतर मागासवर्गीय समाजास राखीव जागा दया – हाजी इर्शादभाई

शेख मुजाहिद
सहसंपादक मो.7798306192
इतर मागासवर्गीय समाजासाठी आरक्षित असलेल्या जागेत मुस्लिम समाजातील इतर मागासवर्गीय समाजास राखीव जागांचे आरक्षण देण्यात यावे अशी मागणी समस्त मुस्लिम जमात, महाराष्ट्र चे प्रदेशाध्यक्ष/ सदर व अॉल इंडिया मुस्लिम ओ. बी. सी. ऑर्गेनाइजेशनचे महासचिव हाजी इर्शादभाई यांनी महाराष्ट्र सरकार व इतर मागासवर्गीय आयोगा कडे केली आहे.
मुस्लिम समाजातील इतर मागासवर्गीय मुस्लिम समाज हा शैक्षणिक, राजकीय व सामाजिक दृष्ट्या अतिशय मागासलेला असून मुस्लिम समाजास व विशेषतः मुस्लिम समाजातील इतर मागासवर्गीय समाजास मुख्य राष्ट्रीय प्रवाहात आणण्यासाठी व मुस्लिम समाजाची आर्थिक तसेच सामाजिक प्रगती करण्यासाठी राज्य सरकारने तातडीने इतर मागासवर्गीय समाजासाठी असलेल्या आरक्षित जागेतून मुस्लिम इतर मागासवर्गीय समाजातील जातींना राखीव जागांचे आरक्षण द्यावे कारण इतर मागासवर्गीय समाजात येणाऱ्या मुस्लिम मागासवर्गीय जाती फक्त कागदोपत्रीच अस्तित्वात असुन त्या मुस्लिम इतर मागासवर्गीय जातींना आरक्षणाचा किंवा सरकारच्या कोणत्याही योजनांचा कोणत्याही प्रकारे लाभ मिळत नसल्या कारणांमुळे राज्य सरकारने त्वरित मुस्लिम इतर मागासवर्गीय जातींमध्ये येणाऱ्या जातींना राखीव जागांवर आरक्षण द्यावे अशी मागणी महाराष्ट्र सरकार कडे हाजी इर्शादभाई यांनी केली आहे. मुस्लिम आरक्षण हा मुस्लिम अल्पसंख्याक समाजाचा संविधानिक अधिकार असतानाही राज्य सरकार मुस्लिम आरक्षणा संदर्भात कानाडोळा करून वेळ काढूपणा करीत असल्याची टिका हाजी इर्शादभाई यांनी केली आहे.
मुस्लिम इतर मागासवर्गीय समाजातील आतार व मनियार या दोन जातींना भटके विमुक्त जाती जमाती चा दर्जा देण्यात यावा अशी मागणी ही हाजी इर्शादभाई यांनी केली आहे. आतार व मनियार या जातींचे लोक उदरनिर्वाहासाठी एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी फिरत असतात ते पूर्ण आठवडा परिसरातील आठवडे बाजार व यात्रा करून आपले व आपल्या कुटुंबातील सदस्यांचे उदर निर्वाह करीत असतात म्हणुन राज्य सरकारने व इतर मागासवर्गीय आयोगाने या दोन जातींना भटके विमुक्त जाती जमाती मध्ये समाविष्ट करून न्याय दयावा अशी मागणी ही हाजी इर्शादभाई यांनी केली आहे.
मुस्लिम समाजातील सर्व पक्षीय नेत्यांनी मुस्लिम समाजातील प्रश्नां संदर्भात तसेच मुस्लिम समाजाच्या शिक्षण, संरक्षण व आरक्षण या विषयी एकत्र येऊन आवाज उठवावा असे आवाहन ही हाजी इर्शादभाई यांनी केले आहे.