पुरवठा निरीक्षकाच्या कामाच्या गतीने लाभार्थ्यांना थेट लाभ दलालांचे वर्चस्व कमी . .!

शेख मुजाहिद ससंपादक मो.7798306192
येथील तहसील कार्यालयाच्या पुरवठा विभाग अतंर्गत लाभार्थ्यां करिता अत्यंत महत्त्वाची सुविधा म्हणजे राशन कार्ड व धान्य पुरवठा योजना ही राबविली जाते परंतु मागील अनेक वर्षापासून लाभार्थ्यांचे प्रलंबित असलेले विषय नुकतेच रुजू झालेले पुरवठा निरीक्षक अमोल महाजन यांनी निकाली काढल्याने लाभार्थ्यांना थेट लाभ मिळत असल्याने व दलालांचे वर्चस्व कमी झाल्याने लाभार्थ्यांमध्ये आनंदाचे वातावरण पसरले आहे .
येथील तहसील कार्यालय अंतर्गत पुरवठा विभागात नुकतेच रुजू झालेले पुरवठा निरीक्षक अमोल महाजन यांनी मागील अनेक महिन्यापासून प्रलंबित असलेल्या लाभार्थ्यांचे राशन कार्ड , अन्नधान्य सुरक्षा योजना, अन्नपुरवठा योजनेअंतर्गत येणारे विविध विषयांचा नियोजन करून निकाली काढण्याचे काम केले आहे त्यामुळे अन्नपुरवठा योजने पासून वंचित असलेल्या नागरिकांना थेट सुविधा मिळेल अशी व्यवस्था पुरवठा निरीक्षक यांनी उपलब्ध केली आहे .
आत्तापर्यंतचे अनेक लाभार्थी या योजनेपासून वंचित होते व राशन दुकानदारांच्या काही अडचणीमुळे लाभार्थ्यांना अन्नधान्य मिळत नव्हते अशा लाभार्थ्यांना योजनेचा लाभ मिळावा या उदात्त हेतूने पुरवठा निरीक्षक यांनी सदर योजनेचे नियोजनबद्ध पद्धतीने काम करून लाभार्थ्यांना लाभ देण्याचा प्रयत्न केला आहे त्यामुळे परिसरातील समस्त लाभार्थ्यांकडून समाधान व्यक्त केला जात आहे .
तसेच मागील अनेक वर्षापासून गोरगरिब लाभार्थ्यांची फसवणूक करून कमी वेळात राशन कार्ड काढून देतो अशा मध्यस्थी दलालाकडून अनेक नागरिकांची फसवणूक केली जात होती परंतु पुरवठा निरीक्षक यांनी थेट लाभार्थ्यांना संपर्क साधावे असे फलक लावल्यानंतर सामान्य नागरिकांची लूटही कमी झाली आहे .तसेच पुरवठा निरीक्षक यांनी कोणत्याही योजनेच्या कामासाठी कोणत्याही दलालाची मध्यस्थी स्वीकारली जाणार नाही असे त्यांनी स्पष्ट शब्दात सांगितले आहे .तसेच योजनेच्या कामासाठी कोणत्याही दलालाला पैसे अथवा कागदपत्र देऊ नयेत अशी आवाहन त्यांनी केले .अनेकदा मध्यस्थी दलाल लाभार्थ्यांना चुकीची माहिती देऊन त्यांची फसवणूक करतात किंवा बनावट कागदपत्रे सादर करून अपात्र लोकांना पात्रतेचा लाभ मिळवून देतात या गैरप्रकारांना आत्ता पूर्णपणे आळा घालण्यात येणार आहे या योजनेसंदर्भात सध्या थेट लाभ लाभार्थ्यांना मिळणार आहे .तसेच लाभार्थ्यांना कोणती अडचण असल्यास त्यांनी थेट संबंधित पुरवठा निरीक्षक यांच्याशी संपर्क साधावा असे आवाहान तहसीलदार राजू सुरडकर यांनी केले आहे या निर्णयामुळे गरजूंना योग्य आणि जलद मदत मिळेल योजनेतील गैरप्रकार थांबण्यास मदत होईल असा विश्वास त्यांनी व्यक्त केला आहे .
पुरवठा निरीक्षक अमोल महाजन यांच्या या भूमिकेमुळे आता राशन कार्ड व अन्नधान्य पुरवठा योजना विभाग दलाल मुक्त होईल अशी अपेक्षा नागरिकांमध्ये निर्माण झाली आहे .
चौकट ।
शासन नियमानुसार लाभार्थ्यांचे सर्व कागदपत्रे व विहित नमुन्यात अर्ज प्राप्त झाल्यास त्यावर तात्काळ कारवाई करण्यात येते तसेच सर्व अभिलेख व्यवस्थित जतन करून ठेवण्यात येते तालुक्यातील लाभार्थ्यांची लोकसंख्या अधिक असल्यामुळे सुट्टीच्या दिवशीही शासकीय कामे करण्यासाठी मला हजर राहावे लागते मी
रुजू झाल्यापासून आत्तापर्यंत शेकडो लाभार्थ्यांचे प्रलंबित विषय निकाली लावले आहेत .
पुरवठा निरीक्षक
अमोल महाजन
चौकट ।
पुरवठा निरीक्षक यांनी पदभार स्वीकारले तेव्हापासून सदर योजनेतील लाभार्थ्यांची प्रलंबित विषय निकामी लागले आहेत व पुरवठा निरीक्षकांनी सदर विभागात सुशोभीकरण करून दस्तऐवज , अभिलेख सुव्यवस्थितपणे जतन करून ठेवले असून तसेच राशन कार्ड व अन्नपुरवठा या योजने मधील लाभार्थ्यांना थेट लाभ मिळत असल्यामुळे लाभार्थी माझ्याकडे समाधान व्यक्त करीत आहेत .
आर यु सुरडकर
तहसीलदार उमरखेड