हिंगोली लोकसभा मतदारसंघातून निघाला रामदास पाटील “आप आगे बढो,हम तुम्हारे साथ है/” चा सुर

शेख मुजाहिद
सहसंपादक मो.7798306192
हिंगोली लोकसभा मतदार संघाची उमेदवारी महायुती कडून विद्यमान खासदार हेमंत पाटील यांना देण्यात आल्याने भाजप कार्यकर्ते चांगलेच नाराज झाले असून हिंगोली येथे आयोजित आढावा बैठकीत रामदास पाटील सुमठाणकर आगे बढो हम तुम्हारे साथ है च्या घोषणा बाजीने बैठक दणाणून सोडली होती तर पाटील समर्थकांनी पक्ष श्रेष्ठींनी पुन्हा एकदा विचार करून याठिकाणी रामदास पाटील यांना उमेदवारी बहाल करून त्यांच्यावरील अन्याय दुर करावा अशी मागणी केली आहे.
हिंगोली लोकसभा मतदार संघातुन निवडणूक लढवून मतदार संघाचा संपुर्ण सर्वांगीण विकास करण्याचे स्वप्न उराशी बाळगुन आपल्या नोकरीचा राजीनामा देत भाजप पक्षाच्या लोकसभा प्रभारी म्हणून जबाबदारी पार पाडत मतदार संघातील प्रत्येक शहर, गाव, वाडी, तांडे, वस्त्यांवर केंद्र शासनाच्या विविध योजना, करण्यात आलेलीविकास कामे पोहचविण्यासाठी जनजागृती, रथयात्रा, बैठका, लोकसभा प्रवास, घर घर भाजप अभियानाच्या माध्यमातून समाजातील शेवटच्या घटका पर्यंत पोहचवुन त्यांच्या अडीअडचणी सोडविण्यासाठी केलेले प्रयत्न, अनेक दुर्धर आजारग्रस्त रुग्णांना वेळेवर औषधोपचार, शस्त्रकिया करण्यासाठी शासन स्तरावरून आर्थिक मदत मिळवून देत अबाल वृद्धांच्या मनात घर निर्माण करणारे तसेच जनतेचे उमेदवार म्हणुन चर्चेत असलेले माजी सनदी अधिकारी रामदास पाटील सुमठाणकर यांना उमेदवारी मिळेल अशी आशा भाजप कार्यकर्ते, समर्थक व मतदारांना लागली होती. परंतु ही उमेदवारी विद्यमान खासदार हेमंत पाटील यांना देण्यात आल्याने पाटील समर्थक व भाजप कार्यकर्ते चांगलेच नाराज असल्याचे चित्र सद्या पहावयास मिळत आहे. सर्व्हेक्षण केले असता
हेमंत पाटील यांचा कार्यकाळ विशेष असा प्रभावी ठरला नाही. त्याच्या कार्यशैलीवर खुद्द शिवसेना पदाधिकारी, शिवसैनिक, भाजप पदाधिकारी व ज्यांच्या आशीर्वादामुळे निवडणूक जिंकायची आहे ते मतदारच नाराज असताना हेमंत पाटील यांनाच उमेदवारी देण्याचा अट्टाहास कशासाठी? असा सवाल भाजप कार्यकर्त्यांनी हिंगोली लोकसभा आढावा बैठकीत उपस्थित करून पक्ष श्रेष्ठींनी निर्णय बदलुन याठिकाणी उमेदवारी भाजपच्या रामदास पाटील यांना देण्यात यावी अशी मागणी केली आहे. असे न झाल्यास मतदारांच्या नाराजीचा फटका बसुन ही जागा हातची जावून मोर्दीच्या अबकी बार ४००पार या उद्दिष्ठाला धक्का लागू शकतो अशी शंका सुद्धा व्यक्त केल्या जात आहे त्यामुळे पक्ष श्रेष्ठी काय निर्णय घेतात याकडे मतदारांसह भाजप, शिवसेना कार्यकर्त्यांचे लक्ष लागले आहे.