Uncategorized

अधर पुस प्रकल्प वेणी धरणातून पूस नदी पात्रात पाणी सोडण्यास प्रशासनाकडून दिरंगाई आमदार किसनराव वानखेडे महागाव तालुक्यातील पाणी प्रश्नाची दखल घेणार का ?

(प्रकल्प अभियंत्याच्या कार्य प्रणालीवर प्रश्नचिन्ह दरवर्षी देखभालीवर करोडोंचा खर्च तरीही लाभ क्षेत्रात शेतकऱ्यांना पाणी मिळत नाही याची चौकशी होणे गरजेचे ! )

महागांव प्रतिनिधी संजय नागरगोजे

उष्णतेच्या लाटेमुळे आणि पाणी टंचाईच्या झळा सोसत असलेला महागाव प्रशासनाच्या कागदी घोडे नाचविण्याच्या पद्धतीमुळे मेता कुटीस आलेला आहे . दि . २३ -३ – २०२५ रविवारला वेणी येथील रहिवाशी शेतकऱ्यांना सोबत घेऊन धरणाची पाहणी केली असता धरणामधून मेन कॅनॉल मध्ये पाणीपुरवठा सुरू आहे . वेणी धरणापासून हिवरा संगम गावापर्यंत पुस नदीपात्रात पाण्याचा थेंब नाही ! धरण उशाला कोरड घशाला उक्तीप्रमाणे नदीपात्रात पाणी नसल्यामुळे ऐन उन्हाळ्यात जनावरांना पिण्याच्या पाण्याचा प्रश्न गंभीर बनला आहे ! नदीवरून ओलीत करणाऱ्या शेतकऱ्यांच्या पिकाला पाणी नाही आमदार मंत्री महोदयांना निवेदने देऊनही प्रशासन नदीपात्रात पाणी सोडण्यास तयार नाही ! याला जिल्हा प्रशासन तसेच प्रकल्प अभियंताही तेवढाच जबाबदार आहे ! दरवर्षी मार्च महिन्यात नदी पात्रात संरक्षित कोट्यातून पाणी सोडणे क्रम प्राप्त असताना वरिष्ठांना चुकीची माहिती देऊन आपण स्वतः केलेल्या चुकावर सदर अभियंता पांघरून घालत आहे ! धरणामध्ये जलपर्णी काय एका महिन्यात तयार झाली आहे का ? आज पर्यंत सदर अभियंत्याने आपल्या विभागाच्या वरिष्ठांशी बोलून वास्तव सत्य निविदा अंदाजपत्रक तयार करून तसा अहवाल वरिष्ठांना वेळेवर देण्याचे अपेक्षित असताना आता ऐन वेळेवर जलपर्णी काढल्याशिवाय नदीपात्रात पाणी सोडता येणार नाही अशी बतावणी सदर अभियंता करतो आहे . धरणामध्ये कमी प्रमाणात जलपर्णी असताना यांना ती दिसली नाही का ? धरणाचा मेन रस्ता सुद्धा अत्यंत खराब झाला असून रोडवर दगडांचे ढीग साचले आहेत सदर रोड केव्हा तयार केला याची चौकशी होणे गरजेचे आहे ! ठेकेदाराला कामाची मुदत संपून दोन वर्षे झाले तरी देखील ठेकेदारांना ब्लॅक लिस्टमध्ये टाकले नाही या वर्षी कॅनॉल दुरुस्तीच्या कामासाठी परराज्यातील जेसीबी मशीन चा वापर करून किती खर्च केला याची सुद्धा चौकशी होणे गरजेचे आहे ! गेली अनेक वर्षापासून भगत नामक अभियंता या प्रकल्पावर ठाण मांडून बसला आहे ! मागील पाच ते सात वर्षात शासनाच्या तिजोरीवर डल्ला मारून बोगस कामे केली आहे त्याचे ऑडिट होणे गरजेचे आहे.शेतकऱ्यांच्या हितासाठी शासनाचा हा मोठा प्रकल्प नियोजना अभावी पांढरा हत्ती ठरतो आहे . जिल्हाधिकारी आणि प्रकल्पाचे वरिष्ठ अधिकारी यांनी संयुक्त पथक पाठवून संबंधित जलपर्णी काढण्यासाठी वास्तवात किती खर्च लागतो याची खातरजमा करूनच खर्चाचं टेंडर मंजूर करावे , तांत्रिक कारणे दाखवून नदीपात्रात पाणी सोडता येत नाही हे चुकीचे आहे ! मा .ना . इंद्रनील नाईक आमदार किसनराव वानखेडे जिल्हाधिकारी यवतमाळ यांनी स्वतः जातीने धरण प्रकल्पास भेट देऊन नदीपात्रात पाणी सोडण्यासाठी योग्य ती कार्यवाही करावी . गेल्या दोन वर्षात धरणाच्या सुरक्षेच्या दृष्टीने कायप्रकल्प अभियंत्याने काय उपाययोजना केल्या ! कॅनॉल दुरुस्तीवर किती खर्च झाला ! प्रकल्पाच्या रोडची दुरावस्था , नाईट वॉचमन , सिक्युरिटी स्टॉप विश्रामगृहाची अवस्था प्रकल्प अभियंता पूर्णवेळ कर्तव्यावर हजर राहतो का या सर्व बाबींची चौकशी होणे अत्यंत गरजेचे आहे . कार्यकारी अभियंता यवतमाळ यांच्या संगनमताने भ्रष्टाचार करून बोगस बिले काढल्याचा कारभार सुरू आहे येत्या दोन दिवसात धरणातून नदीपात्रात पाणी न सोडल्यास महागाव तालुक्यातील नदी काठावरील गावातील सरपंच आणि ग्रामस्थ तहसीलदार यांना निवेदन देऊन उपोषणास बसणार असल्याचे कळते . बॉक्स : लोअर पुस वेणी धरण प्रकल्पाच्या निर्मितीपासून आजपर्यंत शासनाने खर्चाचे ऑडिट केल्यास किती भ्रष्टाचार झाला हे सर्व सामान्य जनतेस कळणार ! मागील वीस वर्षापासून सतत चुकीचे कामे करून सदर प्रकल्पाची प्रकल्प अधिकाऱ्यांनी वाट लावली आहे .

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!