Uncategorized

आज दि.२८/०५/२०२५ रोजी भारतीय स्वातंत्र्यसैनिक, लेखक, राजकारणी आणि थोर समाजसुधारक स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर यांच्या

महागाव प्रतिनिधी संजय नागरगोजे

जयंतीनिमित्त ग्रामपंचायत हिवरा (सं.) येथे प्रतिमेस पुष्पहार अर्पण करण्यात आला.स्वातंत्र्यवीर सावरकर हे हिंदू तत्त्वज्ञ, आणि भाषाशुद्धी व लिपिशुद्धी ह्या चळवळींचे प्रणेते होते.१९३८ च्या साहित्य संमेलनाचे अध्यक्ष होते. ‘हिंदुत्व’ या संकल्पनेचे प्रणेते असून सर्वसमावेशक हिंदुत्व मांडणारे होते. सावरकरांच्या मतानुसार हिंदुत्वाची व्याख्या पुढीलप्रमाणे :- आसिंधु सिंधु पर्यन्ता, यस्य भारतभूमिका । पितृभू: पुण्यभूश्चैव स वै हिंदुरिति स्मृत: ॥ आहे असे विचार उद्योगशील व्यापारी श्री.अभय बोंपिलवार यांनी व्यक्त केले.
यावेळी हिवरा (सं.) ग्रामपंचायत चे उपसरपंच श्री.शरद कदम पाटील , ग्रामपंचायत सदस्य श्री.राजुभाऊ धोतरकर , गावातील प्रतिष्ठित नागरिक अभयजी बोंपीलवार, श्री.रामराव कदम ,चोखा ठंमके, सोनबा सुभाष थोरात,श्री.गजानन कदम , श्री.दत्ता हरसिंग चव्हाण , श्री.विनोद नानु जाधव, राजेश कदम, सुनील पडघाने, शिवशंकर गंदेवार तसेच गावातील विविध क्षेत्रातील मान्यवर , गावकरी व ग्रामपंचायत कर्मचारी श्री.सुधीर कदम , श्री.स्वप्निल बेलखेडे , श्री.आशिष कदम , श्री.समाधान मोरे , श्री.अशोक भुसारे , श्री.विनोद चव्हाण उपस्थित होते.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!