Uncategorized

रेतीच्या गाड्या पकडल्या आणि सोडल्या; मुळव्याच्या तलाठीची अफलातून कामगीरी !

  • तलाठ्याची हुजरेगिरी की दलाली !

मुख्य संपादक

उमरखेड : काल रात्रीच म्हणजे दिनांक ४ एप्रिल २०२५ रोजी रात्री ८ ते ९ च्या दरम्यान तहसील प्रशासनाने तलाठ्याच्या सहाय्याने अवैध रेती चोरी करून अवैध वाहतूक करणाऱ्या दोन बैलगाड्या पकडले. कार्यवाही करण्याचे सोंग करीत मुळावा पोलीस चौकी सामोर प्रांगणात त्यांना उभे करून गाडीच्या चाक काढण्याचे सोंग करून त्यांना तात्काळ सोडून सुद्धा देण्याची अफलातून कामगिरी उमरखेड तहसील प्रशासनाच्या मुळावा येथील तलाठ्या च्या वतीनेच करण्यात आली. त्यामुळे सर्वत्र अचंभा निर्माण झाला आहे.दरम्यान, दिनांक ५ एप्रिल रोजी रेती तस्कर मुळावा येथील तलाठी कार्यालयच्या घिरट्या घेत असताना सुद्धा आढळून आले आहेत. याविषयी रेती चोरीवर कार्यवाही करण्यात अली का तलाठ्याला संपर्क केले असता हो म्हणून फोन कट केले व पुन्हा फोन उचलेच नाही त्यानंतर मंडळ अधिकारी एस एम वाघमारे यांना भ्रमध्वनी द्वारे विचारण्यात आले तर त्यांनी तलाठ्याला विचारले असता गरीबाच्या गाड्या होते व आमदार साहेबांचा फोन आल्याने गाड्या सोडल्याचे तलाठ्याने मला सांगितल्याचे मंडळधिकारी म्हणाले. विशेष बाब म्हणजे जे रेती चोर ट्रॅक्टर ने चोरी करत होते आज काल त्यांनी कारवाही होत नाही म्हणून बैलगाड्या द्वारे अवैध रेती विक्री चा नवीन फंडा सुरु केला आहे. ट्रॅक्टर ने रेती आणून एकाजागी स्टॉक करतात व नंतर बैलगाड्याने विकतात.परंतु सर्वात महत्त्वाची बाब म्हणजे, तलाठयाने पोलीस चौकी सामोरे प्रांगणात त्या गाड्या उभे केल्या. तदनंतर काही अनपेक्षित घडामोडी झाल्या आणि सर्व जबाबदारी आपल्या खांद्यावर घेत या गाड्या सोडण्याचा निर्णय घेतला. यावेळी तेथे अनेक जण उपस्थित होते त्यांना पळसाची पाने पुसुन हाकलवून दिले. सध्या मुळावा व परिसरात घरकुल व अनेक वास्तू निर्मितीचे कार्य अखंडित चालू असून या ठिकाणी अनेक नवनवीन निर्माण होत आहेत. यामुळे रेतीचा तुटवडा सहाजिकच पडत असल्याने अव्वाच्या सव्वा रेती विक्री केली जात आहे यातच दिवट पिंपरी मुळावा तिवरंग शे. पिंपरी येथे स्थित असलेले रेती तस्कर मोठ्या जोमात असून ते आपली रेती धनज मोहदरी पिंपळदरी तिवरंग सह परिसरातील व मराठवाड्यातील अनेक गाव खेड्यात मोठ्या रकमेचा भाव घेऊन विक्री करत असल्याचे ऐकिवात आहे याशिवाय तहसीलदार, मंडळ अधिकारी तलाठी एवढेच काय भरारी पथक व एस.डी.ओ. यांना रेती तस्करांनी आपल्या हातचे खेळणे बनवून सदरील वाहतूक मोठ्या जोमाने करण्याचा निर्णय घेत आहेत यासाठी दलाली करण्यासाठी तलाठ्याच्या आधार घेतला जात आहे अशी चर्चा सुरु आहे व या बद्दल बातम्या प्रसिद्ध करणाऱ्या पत्रकारांना अप्रत्यक्ष रित्या दुसऱ्याच्या मार्फत धमक्या दिल्या जात आहेत. यांच्या दादागिरीने परिसरातील जनता धास्तावली आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!