वामन मेश्राम यांच्या परिवर्तन यात्रेचे उमरखेड तालुक्यातील जोरदार स्वागत.

शेख मुजाहिद
ससंपादक मो.7798306192
दि.3 सप्टेंबर 2024 रोजी राष्ट्रिय परिवर्तन मोर्चा द्वारे बहुजन मुक्ती पार्टी च्या समर्थनार्थ महराष्ट्रातील संपूर्ण जिल्ह्यांमध्ये विधानसभा निहाय परिवर्तन यात्रा आयोजित करण्यात आलेली आहे.या यात्रेची सुरुवात 28 ऑगस्ट नागपूर येथून झालेली असून शेवट 15 सप्टेंबर रोजी मुंबई येथे होणार आहे
या परिवर्तन यात्रेचे नेतृत्व भारत मुक्ती मोर्चा चे राष्ट्रीय अध्यक्ष वामन मेश्राम हे करत आहेत.तर सनेतृत्व बहुजन मुक्ती पार्टी चे प्रदेशाध्यक्ष श्रीकांत दादा होवाळ हे करीत आहेत.

या परिवर्तन यात्रेचे आगमन महागाव तालुक्यातून उमरखेड तालुक्यात झाले.यावेळी निंगणुर,हिरामण नगर,मेट, टेंभेश्वरनगर येथून ढानकी मध्ये महापुरुषांच्या प्रतिमाना अभिवादन करून,
हरदडा, विडूळ यांसह अनेक गावांमध्ये या परिवर्तन यात्रेचे भव्य स्वागत करण्यात आले.
येथून उमरखेड येथे छत्रपती शिवाजी महाराज तथा डॉ . बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतीमेस वामन मेश्राम यांनी अभिवादन करून ढोल ताशांच्या गजरात शेकडो गाड्यांचा ताफा कार्यक्रम स्थळी कृषी उत्पन्न बाजार समिती कडे रवाना झाला.

यावेळी आयोजित प्रबोधन कार्यक्रमात, आता बहुजनांनी प्रस्थापित पक्षांच्या मागे न लागता ,आपला वापर न होऊ देता राष्ट्रीय स्तरावर तिसरा मोर्चा बनवून शासनकर्ती जमात बनावे लागेल.यासह मराठा आरक्षण मिळाले पाहिजे.ओबिदी जनगणना झाली पाहिजे.टाटा एससी, एसटी च्या वर्गीकरणावर वामन मेश्राम यांनी सखोल मार्गदर्शन केले.
यावेळी प्रमुख मार्गदर्शक म्हणून
विद्वान केवटे यांनी,”आता आपण सामने जनतेने आपल्या हिताचे कार्य करणाऱ्या इमानदार नेतृत्वाला मतांचा योग्य वापर करून लोकशाही जिवंत ठेवण्यासाठी आपले प्रतिनिधी म्हणून निवडून दिले पाहिजेत.असे आव्हान केले”.
यावेळी श्रीकांत होवाळ,वर्षाताई देवसरकर, बिमोद मुधाने,गणपत गव्हाळे यांनी आपले विचार मांडले.कार्यक्रमाच्या यशस्वितेसाठी राष्ट्रीय परिवर्तन मोर्चा तथा भारत मुक्ती मोर्चा च्या कार्यकर्त्यांनी विशेष परिश्रम घेतले.

अठरापगड जाती धर्मातील बांधवांनी सामाजिक जगृतीसाठी एकत्र येऊन आयोजित केलेल्या या कार्यक्रमाची काल संपूर्ण तालुक्यात सर्वत्र चर्चा होताना दिसत आहे.