शेती मित्र अशोक भाऊ वानखेडे आरसीएफ द्वारा”प्रगत किसान”राष्ट्रीय पुरस्कार बहाल

शेख मुजाहिद ससंपादक मो.7798306192
उमरखेड :- तालुक्यातील सुकळी जहागीर येथील प्रयोगशील व कृषी अभ्यासक शेती मित्र-अशोक वानखेडे अध्यक्ष-भाऊसाहेब माने कृषी प्रतिष्ठान उमरखेड यांना 25 जानेवारी 2025 रोजी भारत सरकार रसायन व ऊर्जा मंत्रालय नवी दिल्ली यांच्या शेतकरीहितासाठीचा समृद्धीचा अंगीकृत उपक्रम आरसीएफ अंतर्गत कृषी क्षेत्रात राज्यभर कृषी तंत्रज्ञान प्रसार व परिसरातील शेतकऱ्यांना आरसीएफ उत्पादनाचा आगळ्यावेगळ्या शेतकी मायबोलीत मार्गदर्शन करून परिसरातील कृषी क्षेत्रात उल्लेखनीय कार्याबद्दल त्यांना राष्ट्रीय स्तरावरचा हा सन्मान व पुरस्कार व्हिडिओ कॉन्फरन्स द्वारा वितरणाचा प्रियदर्शनी सभागृह आरसीएफ क्षेत्रीय कार्यालय मुंबई येथून राष्ट्रीय स्तरावर वितरित करण्यात आला. आरसीएफ चे अध्यक्ष तथा निदेशक श्रीनिवास मूड गेरेकर यांच्या शुभहस्ते वितरित करण्यात आला. या कार्यक्रमाला प्रमुख उपस्थिती म्हणून निदेशक (वित्त) नजहत शेख, निदेशक ऋतू गोस्वामी, मुख्य सत्कर्ता अधिकारी राहुल जगताप, गणेश वरगंटीवार (संपादकीय सल्लागार सदस्य) आणि देशभरातील आरसीएफ चे महाप्रबंधक, उपमहाप्रबंधक, त्यांच्या उपस्थितीत हा सन्मान पुरस्कार वितरण सोहळा ऑनलाइन प्रणालीच्या माध्यमातून देशभरातून संपन्न झाला.
महाराष्ट्रातून अमरावती विभागातील एकमेव शेतकरी म्हणून शेती मित्र अशोक वानखेडे यांची निवड होऊन अमरावती येथील विभागीय कार्यालय विजय बाविस्कर क्षेत्र प्रबंधक, मनमोहन देशमुख यवतमाळ, करण जयस्वाल वाशिम, अभय नवा ते अमरावती, आदी मान्यवर अधिकारी वर्गासमवेत कार्यक्रम संपन्न झाला. या कार्यक्रमाचे आयोजन सुश्री सुनेत्रा कांबळे कार्य पालक निर्देशक आणि सूत्रसंचालन एम एस फरो की उपप्रबंधक आरसीएफ मुख्य कार्यालय मुंबई यांनी केले.
कृषी क्षेत्रातील कृषी विद्यापीठ, कृषी विभाग आणि भाऊसाहेब माने कृषी प्रतिष्ठान यांच्या माध्यमातून वानखेडे यांनी राज्यभरात कृषी क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करीत आहेत. त्यांना या अगोदर शेती मित्र 2002, उद्यान पंडित २०१६, मा. राज्यपालांच्या हस्ते राज्यस्तरावर सन्मानित करण्यात आले. तसेच डॉ. एम एस स्वामीनाथन ट्रस्ट चेन्नई च्या NVA 2015 राष्ट्रीय फेलोशिप हा बहुमान मिळाला आहे. प्रसार भारती (भारतीय प्रसार निगम) आकाशवाणी महानिर्देशालय नवी दिल्ली यांच्याकडून किसान वाणी कार्यक्रमात सर्वाधिक मार्गदर्शन केल्याबद्दल देशातून पहिल्या दहा शेतकऱ्यांपैकी सन्मानित करण्यात आले. डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ अकोला यांचे 2024 ते आयडॉल शेतकरी आहेत. कृषी क्षेत्रात इतरही संस्था, संघटना व प्रतिष्ठानकडून त्यांना अनेक वेळा बहु मानाने सन्मानित करण्यात आले आहे.
त्यांना मिळालेल्या या या सन्मानास राज्यभरातील त्यांच्या संपर्कातील शेतकरी, कृषी शास्त्रज्ञ, कृषी अधिकारी यांनी त्यांचे गौरवास्पद कौतुक केले आहे त्यांनी मिळालेल्या या सन्मानाला राज्यातील त्यांच्या”सत्यशोधक लखपती शेतकरी पॅटर्नचा अवलंब करणाऱ्या शेतकऱ्यांना व त्यांचे प्रमुख मार्गदर्शक कृषी शास्त्रज्ञ डॉ. विजयराव माने आणि वानखेडे परिवारातील शेती करणाऱ्या त्यांचे सहकारी भाऊ भावंड यांचे चरणी समर्पित करीत असल्याचे त्यांनी सांगितले आहे.
====-================
सोबत फोटो