Uncategorized

नवीन वर्ष 2025: संत रामपाल जी महाराजांच्या सत्यज्ञानाने जीवन प्रकाशित करा

विलास राठोड (ग्रामीण प्रतिनिधी उमरखेड )मो. 7875525877

नांदेड, महाराष्ट्र 2024 संपणार आहे आणि नवीन वर्ष 2025 साजरे करण्यासाठी लोक आतुरतेने प्रतीक्षा करत आहेत. प्रत्येक व्यक्तीमध्ये नवीन वर्षाबद्दल खूप उत्साह बघण्यास मिळतो. 31 डिसेंबरच्या रात्रीपासून सुरू होणारा नवीन वर्षाचा उत्सव अनेक दिवस चालतो. लोक नुतन वर्षात जाणून घेऊ इच्छितात की कोणते कपडे घालावे, काय खावे, कुठे पार्टी करावी, कोणते गिफ्ट द्यावे, कोणते संकल्प करावेत, निरोगी कसे राहावे, आजारांपासून कसे रक्षण करावे, कोणती पुस्तके वाचावी, कुठे प्रवास करावा इत्यादी इत्यादी. परंतू व्यक्ती नववर्षाच्या आनंदात आपल्या मानवी जीवनाचा मुख्य उद्देश विसरतो. आज आम्ही आपल्याला सांगणार आहोत की हे नववर्ष (New Year) जीवनातील सर्वात महत्त्वाचे वर्ष कसे बनवावे आणि कोणत्या संकल्पांसह आपले मानवी जीवनाचे मूळ उद्दिष्ट पूर्ण करू शकतो. कारण आपल्या सर्वांना माहित आहे की येथे एका क्षणाचाही भरोसा नाही, कधी कोणासोबत कोणती दुर्घटना घडेल अर्थात हे लोक आनंद साजरा करण्या योग्य नाही. येथे दररोज लाखो निष्पाप मारले जातात, म्हणून येथून भक्ती करून फक्त सुटण्याचा विचार करायला हवा. 1 जानेवारी रोजी नवीन वर्ष साजरे करण्याची सुरुवात कशी झाली ? सन 1582 पूर्वी नवीन वर्ष कधी 25 डिसेंबर (येशू जन्मदिन) तर कधी 25 मार्च (उत्सवाचा पर्व) अशा धार्मिक महत्त्वाच्या दिवशी साजरा केला जात असे. सन 1582 मध्ये पोप ग्रेगरी XIII यांना जूलियन कॅलेंडरमध्ये लीप वर्षाबाबत काही चुका आढळून आल्या. ज्यामुळे एक नवीन कॅलेंडर तयार करण्यात आले, ज्याला ग्रेगोरियन कॅलेंडर म्हणून ओळखले जाते. पोप ग्रेगरी XIII यांनी 1 जानेवारी हा दिवस सन 1582 मध्ये नवीन वर्षाचा दिवस म्हणून निश्चित केला. नवीन वर्षा निमित्ताने करा नवी सुरुवात नवीन वर्ष आपल्याला स्वतःला ओळखण्याची, जाणून घेण्याची आणि नवीन पद्धतीने जीवन जगण्याची एक नवीन संधी देत असते. या नवीन वर्षात असा संकल्प करा की जीवनही यशस्वी होईल आणि हे वर्ष तुमच्यासाठी कायमस्वरुपी स्मरणात राहील. हे संसार निखारांचे घर आहे जिथे विकार, कामवासना, लोभ, आळस, आजार, आकांक्षा आणि संपत्तीची कमतरता व अधिकता व्यक्तीला नेहमी अस्थिर ठेवतात. अशा परिस्थितीत केवळ एकच शक्ती
2025 आहे जी आपल्याला प्रत्येक विकार, दुःख, त्रास, आपत्तीपासून वाचवू शकते. ती म्हणजे परमेश्वर. त्या एका परमेश्वराची ओळख असणं आणि त्या एका परमेश्वराची ओळख होणे, त्या परमेश्वरावर तुमचा ठाम आस्था आणि निर्भरता असली पाहिजे. मानव जीवन खूपच महत्त्वाचे आहे. बदल हा प्रकृतीचा नियम आहे. जसा दिवस बदलतो आणि नवीन दिवस उगवतो, त्याचप्रमाणे वर्ष बदलते आणि नवीन वर्षाचे आगमन होते. नववर्ष नवीन ऊर्जा आणि उत्साहाचा स्रोत असतो. जोपर्यंत मानव जीवन आहे, तोपर्यंत व्यक्ती मानव जीवनाच्या मूळ उद्देशाला जाणून घेऊन त्यास साध्य करण्याचा प्रयत्न करू शकतो. म्हणून मानव जीवनाचा मूळ उद्देश समजून, आपले जीवन यशस्वी बनवण्यासाठी सदैव तत्पर असायला हवे. कबीर साहेब यांनी मानव जीवनाचे महत्व सांगताना म्हटले आहे कीः मानुष जनम दुर्लभ है, ये मिले ना बारंबार | जैसे तरुवर से पत्ता टूट गिरे, बहुर ना लगता डार || म्हणजे ज्याप्रमाणे झाडावरून पडलेले पान खाली पडते आणि ते पुन्हा जसेच्या तसे लागू शकत नाही, अगदी त्याचप्रमाणे हे मानव जीवन खूप दुर्मिळ आहे. हे खूप काठीनाईने 84 लाख प्रकारच्या योनीं भोगल्यानंतर मिळते. हे जर एकदा निसटले तर पुन्हा मिळणार नाही. नवीन वर्षा निमित्ताने मानव जीवनाचा मूळ उद्देश जाणून घ्या आपले धर्मशास्त्र सांगतात की मानव जीवनाचा मूळ उद्देश भक्ती करून भगवंताला प्राप्त करणे आहे, अर्थात जन्म-मृत्यूपासून मुक्ती मिळवणे, पूर्ण मोक्ष प्राप्त करणे आहे. पवित्र श्रीमद्भागवद् गीतेनुसार मानव जीवनाला मोक्षाचे द्वार म्हटले आहे. मानव जीवन लाभलेला व्यक्ती तत्त्वदर्शी संतांकडून पूर्ण परमात्मा यांची माहिती मिळवून, नामदीक्षा घेऊन, त्याची भक्ती करून मोक्ष मिळवू शकतो. म्हणजेच पूर्ण परमात्मा यांच्या लोकात जाऊ शकतो, जिथे सर्व सुख आहेत. अर्थात त्या सुखमयी स्थानवर जाऊ शकतो, जिथे कधी कोणाचा मृत्यू होत नाही आणि ना वृद्धत्व येत. तेथे ना कोणता राग- द्वेष आहे आणि ना कोणत्या प्रकारचा विकार आणि ना तेथे कोणत्या गोष्टीची कमी आहे. त्या सुखमयी स्थानास सतलोक असे म्हटले आहे, जे शाश्वत स्थान आहे. या स्थानाची प्राप्ती करणे हाच पूर्ण मोक्ष असतो. तेथे गेल्यानंतर आत्मा पुन्हा या संसारात परत येत नाही. म्हणून मानव जीवन लाभलेल्या सर्व पुण्यात्म्यांनी जन्म-मृत्यू या दीर्घ रोगाचा अंत करण्यासाठी सत भक्ती करणे आवश्यक आहे. नवीन वर्षा निमित्त जाणून घ्या, सर्व दुःखांचा अंत कसा होईल? या मृत्युलोकात जीव कर्म बंधनांमध्ये बांधलेला आहे आणि चुकीच्या व वाईट कर्मांमुळे जीवाला कष्ट भोगावे लागतात. परंतु जेव्हा जीव तत्त्वदर्शी संतांकडून प्राप्त पूर्ण परमात्मा यांची भक्ती योग्य पद्धतीने करतो, तेव्हा त्याच्या चुकीच्या कर्मांचे परिणाम त्याला भोगावा लागत नाही. कारण पूर्ण परमात्म्याची भक्ती केल्याने ते कर्म कटतात, अर्थात नष्ट होतात. केवळ पूर्ण परमात्मा यांची भक्ती केल्यानेच जीव सुखी होऊ शकतो आणि पूर्ण मोक्ष मिळवू शकतो. पवित्र यजुर्वेद अध्याय 8 मंत्र 13 आणि ऋग्वेद मंडळ 10 सूक्त 161 मंत्र 2 मध्ये या गोष्टीचे प्रमाण देखील आहे की पूर्ण परमात्मा साधकाचे सर्व दुःख समाप्त करतात. जर साधक मृत्यूच्या दरात असेल किंवा त्याचा मृत्यूही झाला असेल, तर पूर्ण परमात्मा आपल्या साधकाचे आयुष्य देखील वाढवून देतात. तसेच त्याचे सर्व पाप क्षमा करू शकतात. तसेच ऋग्वेद मंडळ 10 सूक्त 162 मंत्र 5, सूक्त 163 मंत्र 1-3 मध्येही प्रमाण आहे की पूर्ण परमात्मा आपल्या साधकाचे सर्व रोग दूर करू शकतात. अक्षीभ्यां ते नासिकाभ्यां कर्णाभ्यां छुबुकादधि। यक्ष्मं शीर्षण्यं मस्तिष्काज्जिह्वाया वि वृहामि ते ॥ ऋग्वेद मंडळ 10 सूक्त 163 मंत्र 1 अर्थात परमात्मा पाप कर्मापासून आमचा नाश करणारे प्रत्येक कष्ट दूर करून विषारी रोग दूर करतात. तसेच नाक, कान, तोंड, जिभ, शीर्ष, मस्तिष्क यांसारख्या सर्व अवयवांचे संरक्षण करू शकतात. ऋग्वेद मंडळ 9 सूक्त 82 मंत्र 1, 2 आणि 3 मध्ये हे प्रमाण आहे की परमेश्वर पापांचा नाश करत साधकाला प्राप्त होतात. तसेच ऋग्वेद मंडळ 9 सूक्त 86 मंत्र 26 आणि 27 मध्ये हे प्रमाण आहे की परमात्मा आपल्या भक्तांचे विघ्न (संकट) दूर करून त्यांना प्राप्त होतात.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!