Uncategorized

दिंडाळा गावप्रमुखांचा काँग्रेसमध्ये प्रवेश (काँग्रेसचे नेते गोपाल अग्रवाल यांच्या उपस्थितीत प्रवेश)

शेख मुजाहिद ससंपादक मो. 7798306192

उमरखेड :बंजाराबहुल असलेल्या दिंडाळा गावात, चार दिवसापूर्वी येथील सरपंचासह अन्य दोघांनी भाजपात प्रवेश केल्याने, गावात खळबळ उडाली होती. दरम्यान गावातील 20 च्यावर प्रमुखांनी, काँग्रेस नेते गोपाल अग्रवाल यांची भेट घेत, त्यांच्या नेतृत्वाखाली काँग्रेसमध्ये प्रवेश केला. यामुळे आता सरपंचाच्या विरोधात गावाचा कौल गेल्याचे चित्र निर्माण झाले आहे.

 तालुक्यातील दिंडाळा हे गांव तसे नेहमीच काँग्रेसच्या मागे राहल्याचे , आनेक निवडणुकीतून समोर आले आहे. येथील कॉग्रेस पक्षाचे विश्वासु राहिलेले,उमरखेड विविध कार्यकारी सहकारी संस्थेचे उपाध्यक्ष दिवंगत साहेबराव शाहु जाधव यांच्या मागे झालेल्या निधनानंतर, येथील जबाबदारी काँग्रेसने एका पुढाऱ्याकडे दिली होती. ह्याच पुढाऱ्याने कॉग्रेस सोबत विश्वास घात करीत,  20 जुनला भाजपमध्ये प्रवेश केला. यामुळे मात्र गावात प्रचंड संताप व्यक्त करण्यात आला होता. दरम्यान 20 च्या वर  गावातील प्रमुखांसह सामान्यांनी, शुक्रवारी 22 जुन रोजी , कॉग्रेसचे नेते गोपाल अग्रवाल यांची भेट घेतली. त्याच क्षणी त्यांच्यावर विश्वास दाखवित कॉग्रेस पक्षात प्रवेश केला.     

   यावेळी दिंडाळ्याचे माजी पोलीस पाटील भिकू राठोड, माजी सरपंच गुलाब राठोड व शेषराव जाधव, माजी उपसरपंच इंदल राठोड, ठेकेदार नामदेव पवार, नामदेव जाधव, देवसिंग जाधव, दत्ता पवार, गणेश जाधव , अमरसिंग राठोड, बाळू राठोड, अमोल राठोड, दीपक जाधव, दिलीप जाधव, बादल राठोड, परसराम राठोड, राजाराम जाधव, वसंत राठोड, शिवराम जाधव, शंकर राठोड आदी प्रमुखासह सामान्य नागरिकांनी यावेळी प्रवेश केला. यावेळी अर्जुन राठोड, सिद्धार्थ जगताप, ईश्वर गोस्वामी, आदी उपस्थित होते.

कोट
स्वार्थी बेंडुक उड्यांचा जनतेवर परिणाम पडणार नाही

काही दिवसापासून शहरातील काहींनी हिकडून तिकडे बेंडुक उड्या मारल्या, मात्र ही लोक पक्ष संघटनेतील नाहीत. शिवाय पक्षाच्या कार्यक्रमात फक्त एकटेच टाईट कपडे घालून येणारी व पक्ष कार्यातही शुन्य योगदान असलेल्या, अशा स्वार्थी वृत्तीच्या लोकांमागे शहरातील जनता मुळीच नाही. शिवाय येणाऱ्या उमरखेड नगर परिषद निवडणुकीमध्ये, कॉग्रेसकडून उमेदवारी मिळणार नसल्याची कानकुन लागताच, स्वहितासाठी इतर पक्षात उड्या मारल्याने याचा कोणताही परिणाम जनतेवर पडणार नाही. अशी प्रतिक्रिया कॉग्रेसचे युवा नेते गोपाल अग्रवाल यांनी दिली.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!