अवैध सागवान कत्तल दडपण्याच्या हालचाली !काळी (दौ.) वनपरिक्षेत्रातील कर्मचारी सक्रिय

मुख्य संपादक
मालकी पट्ट्याचे नावाखाली बहुमूल्य सागवानाची अवैध तोड सध्या सुरू आहे. एका सर्वे मधून काही सागवानाची झाडे घेणे व दुसऱ्या सर्वे मधून काही झाडे घेऊन ते एकत्र दाखवण्याचा गोरखधंदा सुरू आहे. मालकी पट्ट्याच्या नावाखाली काळी (दौ.) वनपरिक्षेत्रात मोठ्या प्रमाणात अवैध रित्या सागवानाची कतल सुरू आहे.
काही माफिया लकडी ठेकेदार अवैध सागवान कटईच्या गोरख धंद्यात कोट्यावधीची कमाई करीत आहेत. वनविभागातील भष्ट अधिकारी कर्मचाऱ्यांची साखळी या तपासात सहभागी असून ठेकेदारावर मेहरबानी दाखविण्यात येत असल्यामुळे हे सागवान

कतलीचे गौडबंगाल सुरू आहे. कलगाव, सवना, शिरपूर, गुंज या परिसरात मोठ्या प्रमाणात सागवानाची झाडे तोडण्यात आली. वनपरिक्षेत्र काळी ( दौ.) अंतर्गत काही ठेकेदारांनी मालकी पट्ट्यातील वृक्षतोडीचा परवाना घेऊन, दुसऱ्या शेत सर्वेनंबर मधील झाडे तोडून परवाना घेतलेल्या सर्वेनंबरच्या लाकडात मिसळून सागवानाची अवैध तोड सुरू केली आहे. त्यामध्ये महसूलच्या कर्मचाऱ्याचा सुद्धा सहभाग असल्याचे दिसून येते.
सागवानाच्या पट्ट्यामध्ये शेत सर्वेनंबर मध्ये सागवाण्याची पाच झाडे असेल तर २५झाडे दाखवणे व दुसऱ्या शेतातील झाडे त्यामध्ये मिसळून अन्य शेतकऱ्यांच्या शेतातील सागवानाची बेमालूमपणे अवैध तोडणी करून हे सागवान परवाना घेतलेल्या शेताच्या कटाई केलेल्या मलात मिसळून शासनाची दिशाभूल करीत आहेत. सातबारावर नोंदी असलेल्या नोंदीपेक्षा जास्त सागवानाची झाडे तोडणे असे गंभीर प्रकार काळी ( दौ.) वनपरिक्षेत्रात उघडे झाले आहे. या प्रकरणात दोषी असलेल्या अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना तातडीने निलंबित करण्यात यावे अशी मागणी होत आहे. परंतु पुसद उपवनरक्षक या प्रकरणाकडे गंभीरपणे दखल न घेता बोटचेपी भूमिका घेत असल्यामुळे त्यांच्या कार्यप्रणालीवर संशय व्यक्त केला जात आहे. शेत मालकाच्या शेतात प्रत्यक्ष ११ झाडे असतांना पन्नास सागवानाची झाडे तोड करण्यात आली. त्याला परवानगी देण्याचा अफलातून प्रकार काळी (दौ) वनपरिक्षेत्रात कार्यालयाने केला. या बाबत मारोतराव देशमुख यांनी सर्व पुराव्यनिशी मुख्य वनरक्षक यवतमाळ यांच्याकडे तक्रार दिली. सातबारावर कमी झाडे असतांना त्यापेक्षा जास्त झाडे तोडण्याची परवानगी देण्याचे प्रकार अत्यंत गंभीर असून यात काही अधिकाराची संमती असल्याचे दिसत आहे. संबंधितावर कार्यवाही करण्यात यावी अशी मागणी मारोतराव देशमुख यांनी तक्रारीतून केली आहे.