मतदारांना आपला मतदानाचा हक्क बजावण्यापासून वंचित ठेवणाऱ्या कर्मचाऱ्यांवर कठोर कार्यवाही करा

शेख मुजाहिद
ससंपादक मो.7798306192
दिनांक २९/०४/२०२४
हिंगोली लोकसभा मतदारसंघाची निवडणूक शांततेत पार पडल्याबद्दल संपूर्ण निवडणूक यंत्रणेतील अधिकारी व कर्मचारी यांचे अभिनंदन करून १००% मतदानाची अपेक्षा असताना निवडणूक आयोगाच्या यंत्रणेतील कर्मचाऱ्यांच्या निष्काळजी पणामुळे अनेक मतदारांना मतदानापासून दूर ठेवणाऱ्या यंत्रणेतील जबाबदार कर्मचाऱ्यांवर कठोर कारवाई करावी अशी मागणी प्रकाश विश्वनाथ दुधेवार (शहर अध्यक्ष भाजपा) यांनी उपविभागीय अधिकारी तथा निवडणूक निर्णय अधिकारी उमरखेड यांना दिलेल्या निवेदनातून केली आहे.
निवडणूक आयोगाने घेतलेला महत्त्वपूर्ण निर्णय म्हणजे वयोवृद्ध व दिव्यांग मतदारांना त्यांच्या घरी जाऊन मतदान करण्याची दिली संधी परंतु ज्या निवडणूक कर्मचाऱ्यांवर याबाबतच्या सर्वेची व मतदान करून घेण्याची जबाबदारी निश्चित केली होती त्यांच्या निष्काळजीपणामुळे अनेक वयोवृद्ध व दिव्यांग मतदार मतदानाचा आपला हक्क बजावू शकले नाहीत त्याचप्रमाणे ज्या कर्मचाऱ्यांवर मतदारांच्या चिठ्ठ्या मतदारापर्यंत पोहोचविण्याची जबाबदारी दिली त्यापैकी काही कर्मचाऱ्यांनी योग्य काम केले परंतु काही कर्मचाऱ्यांनी त्यामध्ये काम चुकारपणा करून चिठ्ठ्या मतदारांपर्यंत पोहोचल्या नाहीत त्यामुळे अनेक मतदारांना आपला मतदानाचा हक्क बजावता आला नाही तसेच अनेक मतदारांकडे मतदान कार्ड असून मतदार यादीत नाव नसल्यामुळे मतदान करता आले नाही हा मतदारावर झालेला मोठा अन्याय आहे. जिवंत असणारे व ज्यांनी या पूर्वी निवडणुकीत मतदानाचा हक्क बजावला अशा मतदान कार्ड असणाऱ्या शेकडो मतदारांना मतदानापासून दूर ठेवण्यात ज्या कर्मचाऱ्यांचा हलगर्जीपणा झाला व ज्यांच्यामुळे मतदारांची नावे जाणीवपूर्वक मतदार यादीतून डिलीट केली ही नावे त्वरित मतदार यादी मध्ये समाविष्ट करून त्यासाठी जबाबदार असणाऱ्या कर्मचाऱ्यां कडक कारवाई करावी जेणेकरून यापुढे वरील प्रकारामुळे मतदार आपल्या मतदानाच्या हक्कापासून वंचित राहणार नाहीत अशी मागणी निवेदनातून केली आहे यावेळी अनेक भाजप कार्यकर्ते उपस्थित होते.