Uncategorized

हिंगोली लोकसभा निवडणुकीसाठी आज शेवटच्या दिवशी ५१ अर्ज दाखल

आज ८ उमेदवारांना २५ नामनिर्देशन पत्राचे वितरण


शेख मुजाहिद

ससंपादक मो.7798306192


हिंगोली (जिमाका), दि. ४ : लोकसभा निवडणुकीसाठी अर्ज दाखल करण्याचा आजच्या शेवटच्या दिवशी ५१ अर्ज दाखल झाले आहेत. आतापर्यंत एकूण ७७ अर्ज दाखल झाले असल्याची जिल्हा निवडणूक अधिकारी तथा जिल्हाधिकारी जितेंद्र पापळकर यांनी माहिती दिली आहे. आज

नामनिर्देशनपत्र वितरण व स्विकृतीच्या शेवटच्या दिवशी ८ उमेदवारांना २५ अर्जांचे वितरण करण्यात आले असून, आतापर्यंत एकूण १११ इच्छुक उमेदवारांना ३९९ नामनिर्देशनपत्रांचे वितरण करण्यात आले आहे.
शुक्रवार, दि. ५ एप्रिल रोजी नामनिर्देशनपत्रांची छाननी करण्यात येणार असून, सोमवार, दि. ८ एप्रिल २०२४ रोजी उमेदवारी अर्ज मागे घेण्याचा शेवटचा दिवस आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!