शेतकऱ्यांच्या आत्महत्या थांबण्यासाठी त्यांना कर्जमुक्त करा… संध्या रणवीर

शेख मुजाहिद ससंपादक मो. 7798306192
काळी दौ /महागांव दि 24 यवतमाळ जिल्ह्यात शेतकरी आत्महत्या सत्र सुरु असून हे सत्र थांबवण्यासाठी शेतकऱ्यांना कर्जमुक्त करण्याबाबतची मागणी मुख्यमंत्री यांना तहसीलदार,महागांव मार्फत संध्या संदेश रणवीर तालुका अध्यक्ष राष्ट्रवादी महिला काँग्रेस शरदचंद्र पवार महागांव यांनी निवेदनातून केली आहे.
दोन दिवसापूर्वी पांढरकवडा तालुक्यातील महादेव चव्हाण, मारेगाव तालुक्यातील प्रभाकर निखाडे व महागांव तालुक्यातील उटी येथील गजानन गावंडे यांनी आत्महत्या केली.ह्याला कर्जबाजारीपणा,नापिकी व शेतकरी विरोधी सरकारी धोरण जबाबदार असून त्यामुळेच हे शेतकरी आत्महत्येचे सत्र सुरु असून त्याचा संदर्भ निवेदनातून देऊन सरकारने शेतकऱ्यांची कर्जमाफी करून शेतकऱ्यांस कर्जमुक्त करावे कर्जमुक्त झालेला शेतकरी हा आत्महत्येकडे वळणार नाही त्याकरिता सत्तेवर येण्यापूर्वी शेतकऱ्यांच्या कर्जमुक्तीचे शेतकऱ्यांना दिलेले आश्वासन मुख्यमंत्र्यांनी पाळून शेतकऱ्यांना कर्जमुक्त करावे व शेतकरी आत्महत्येला लगाम लावावा अशी विनंती वजा मागणी संध्या रणवीर यांनी मुख्यमंत्री यांना केली आहे.
यावेळी उपविभागीय अधिकारी श्री मुळे, तहसीलदार श्री मस्के यांनी निवेदनाची प्रत स्वीकारून शासनापर्यंत पोहचवण्याचे आश्वासन दिले संध्या रणवीर सोबत सीमा वानखेडे व शिवानी लोने ह्या निवेदन देते वेळी उपस्थित होत्या